Shaina NC : ‘‘माल बोलाल, तर जनतेकडून २३ तारखेला तुमचे हाल होणार” , ठाकरेंच्या खासदाराला फटकारलं

Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच पक्षांचे उमेदवार आपल्या विजयाचे गणित जुळवण्यासाठी चांगलीच धडपड करत आहेत. मुंबई आणि मुंबईतील मतदारसंघ शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी चांगलेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच या दोन्ही गटांनी या ठिकाणच्या जागा जिंकण्यासाठी येथे चर्चेतील चेहरे दिले आहेत. मुंबादेवी येथून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने शायना एन सी यांना तिकीट दिलंय. दरम्यान, एकीकडे प्रचाराला वेग आलेला असताना त्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर विशेष म्हणजे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार शायना एनसी यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्या शिवतीर्थ येथे राज ठाकरेंच्या निवासस्थानी आल्या होत्या. राज ठाकरेंना भेटल्यानंतर त्यांनी माडियाशी संवाद साधला. शायना एनसी यांनी उपस्थित पत्रकारांना एक व्हिडीओ क्लिप ऐकवत अरविंद सावंत यांच्यावर टीका केली. अरविंद सावंत हे उबाठा गटाचे दक्षिण मुंबईचे खासदार आहेत. अरविंद सावंत यांनी माल संबोधल्याने शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला.

“बाहेरचा माल चालणार नाही. मुंबादेवीमध्ये इथलाच माल चालणार, अमिन पटेल” अस अरविंद सावतं म्हणाले. शायना एनसी यांनी त्यांच्या ‘माल’ या शब्दावर संताप व्यक्त केला. पत्रकारांना व्हिडिओ क्लिप दाखवत शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्यावर आरोप केला. अरविंद सावंतांनी माल शब्दाचा वापर करत संबोधल असं शायना एनसी म्हणाल्या आहेत. “राजकारणात सक्षम असलेल्या महिलेला माल संबोधलं, यांची मानसिक स्थिती ठीक नाही” असं शायना एनसी म्हणाल्या.

‘त्यांना विचार ते कुठले आहेत?’

“हे तेच अरविंद सावंत आहेत, ज्यांच्यासाठी मी प्रचार केला. आमच्या बळावर निवडून आले. त्यांना विचारा ते कुठले आहेत?. मी मुंबईची मुलगी आहे. मुंबईची लाडली आहे. मुंबईसाठी काम करणार. मला अरविंद सावंत आणि उबाठाच्या प्रमाणपत्राची गरज नाही” असं शायना एनसी यांनी ठणकावलं.

‘माल बोलाल, तर हाल होणार’

“महिलेला माल म्हणून तुम्ही बघता. एक सक्षम महिला, प्रोफेशनल २० वर्ष स्वबळावर काम करुन पुढे आली आहे. तुम्ही तिच्यासाठी माल सारखे शब्द वापरता. तुमची मानसिक स्थिती त्यातून सगळ्यांना कळते. महाराष्ट्रातील महिला उबाठाला मतदान करणार नाही. महिलांचा सन्मान केला, तर आदर आहे. महिलांना माल बोलवलं, तर तुमचे जे हाल होणार ते २० तारखेला बघा” असं शायना एनसी म्हणाल्या.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

27 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

29 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

49 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago