मुंबईत उडत्या दिव्यांच्या कंदिलांवर बंदी, २१ नोव्हेंबरपर्यंत बंदी लागू

Share

मुंबई: दिवाळीसाठी जर तुम्ही जोरदार जय्यत तयारी करत असाल तर ही बातमी तुम्हाला थोडी निराश करू शकतो. खरंतर, मुंबईत आकाशात उडत्या दिव्यांचे कंदील उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोबतच याच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत ही बंदी असणार आहे. म्हणजेच एक महिन्यांपर्यंत मुंबईत हे दिवे विकले जाणार नाहीत आणि उडवलेही जाणार नाही. गेल्या वर्षीही मुंबई पोलिसांनी घोषणा केली होती.

पोलिसांनी जारी केले आदेश

पीटीआयच्या रिपोर्टनुसार पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. आदेशानुसार, उडत्या दिव्यांचे कंदील विक्री आणि उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

आदेशानुसार स्काय लँटर्न पब्लिक प्रॉपर्टी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतो. जे लोक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २२३ नुसार प्रकरण दाखल केले जाईल.

२०१५मध्ये एका बिल्डिंगमध्ये लागली होती आग

जानेवारी २०१५मध्ये मालाड पूर्वमध्ये एक ३६ मजल्यांच्या इमारतीत आकाशात उडणाऱ्या दिव्यांच्या कंदिलांमुळे आग लागली होती. त्यानंतर तत्कालीन मुंबई अग्निशमन प्रमुख पी राहंगडाले यांनी पोलिसांनी अशा प्रकारच्या दिव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते.

२०२२ आणि २०२३ मध्येही होती बंदी

हा निर्णय काही पहिल्यांदाच घेतलेला नाही. गेल्यावर्षीही मुंबईत यावर बंदी घालण्यात आली होती. २०२३मध्ये ४ नोव्हेंबरपासून ते ३ डिसेंबरपर्यंत एक महिन्यासाठी बंदी घालण्यात आली होती. तेथे २०२२मध्ये १६ ऑक्टोबरपासून ते १४ नोव्हेंबरपर्यंत बंदी घातली होती.

Tags: lanterns

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

4 hours ago