नेवासा (प्रतिनिधी)– नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवी येथे आज सोमवारी दुपारी २ वाजेच्या दरम्यान झाडावर वीज पडून १२ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरच्या वीज पडून झालेल्या दुर्घटनेत संतोष खरात,रामकिसन खोसे, सचिन खोसे, अक्षय पंडित, बाबासाहेब पंडित, अजित पंडित या मेंढपाळांच्या शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू होऊन सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सदरच्या झालेल्या दुर्घटनेने रांजणगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रांजणगावदेवी येथील सहा कुटंबातील सदस्य सामाजिक वनीकरणाच्या परिसरात सुमारे २०० शेळ्या मेंढ्या चरण्यासाठी घेऊन गेले असता सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास वीज पडून १० शेळ्या आणि २ मेंढ्या मृत झाल्या असून ४ मेंढ्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
घटनेची माहिती कळताच रांजणगाव परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तर नेवासा पशुधन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृत शेळ्या मेंढ्यांचे शिवविच्छेदन केले. तर घटनेची माहिती मिळतात धनगर समाजाचे नेते अशोकराव कोळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन मेंढपाळांशी घडलेल्या दुर्घटने विषयी चर्चा करून शासन दरबारी मदतीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…