ST Bus : एसटी प्रवाशांसाठी आनंदवार्ता! दिवाळीत पुणे – अमरावती दरम्यान धावणार अतिरिक्त बस

Share

अमरावती : दरवर्षी दिवाळीत पुणे येथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसह कामानिमित्त नोकरीत असलेल्या प्रवाशांची अधिक संख्या असल्याने ते दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे परतात. परंतु खासगी बसचालक याचा फायदा घेत अव्वाच्या सव्वा तिकिट दर आकारून त्यांची आर्थिक लुट करतात. यामुळे प्रवाशांना सुविधा देण्याकरीता दरवर्षी एसटी महामंडळाच्या (ST Bus Corporation) वतीने पुणे या मार्गावर अतिरिक्त बसेस सोडल्या जातात. एसटी प्रवाशांना दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेता यावा यासाठी पुणे येथून अमरावतीकडे येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथून येण्याकरीता २७ ते ३१ ऑक्टोबर व अमरावती येथून जाण्याकरीता ३ ते १० नोव्हेंबर दरम्यान ५० अतिरिक्त बसेस म्हणजेच १०० फेऱ्या होणार आहे. या व्यतिरिक्त यवतमाळ, अकोला, वर्धा, चंद्रपुर, वाशिम आधी ठिकाणी देखील प्रवाश्यांची संख्या वाहून अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार आहे. याकरीता ऑनलाईन आरक्षणाची सुविधा करण्यात आली असून आतापर्यंत २१ बसेसचे पुणे येथून अमरावतीकरीता बुकींग करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी ऑनलाईन आरक्षण करण्याचे आवाहन विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी केले आहे.

अशी करा ऑनलाईन बुकींग

प्रवाशांनी ऑनलाईन बुकींग रेड बस तसेच अ‍ॅप्सवर राज्यपरिवहन विभागाच्या वेबसाईटवर जावून करता येणार आहे. याकरीता सांकेतिक कोड देण्यात आला आहे. पुणे करीता पीसीएनटी व अमरावती करीता एएमटी कोड चा वापर कराता येणार आहे.

Tags: st bus

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago