मुंबई : संजय राजाराम राऊतसारख्या (Sanjay Raut) बिकाऊ माणसाने भाजपा पक्ष मदारी आणि इतर सर्व माकडं आहेत, असं वक्तव्य करण्याआधी स्वत:च्या बुडाखाली काय आग लागली आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उबाठाला (UBT) एका-एका जागेसाठी दिल्लीमध्ये जाऊन काँग्रेसच्या कोठीवर मुजरे करावे लागतात, नाक रगडायला लागतं तरीही काँग्रेस यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या कोठीवर नाचणाऱ्यांनी दुसऱ्यांना मदारी आणि माकड बोलण्याची हिंमत करु नये, असा घणाघात भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतवर केला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधत टीका केली.
दुसऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा करणं, हिंदुत्व या विषयावर तडजोड करणं, स्वत:ची घरे मोठी करणं या पलीकडे जाऊन संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाने म्हणजेच उद्धव ठाकरेने काहीच केलं नाही. त्याग आणि उद्धव ठाकरेचं काहीच समीकरण नसल्यामुळे भाजपा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंदुत्ववादी सरकार आणण्यासाठी व बाळासाहेबांच्या विचारांसाठी केलेला त्याग संजय राऊतसारख्या भ्रष्टाचारी माणसाला कधीच कळणार नाही, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतला फटकारले.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…