Mumbai Fire : अंधेरीत अग्नितांडव! लोखंडवाला परिसरातील इमारतीला भीषण आग

Share

तिघांचा मृत्यू, अनेक जण अडकल्याची शक्यता

मुंबई : दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईतील एनआर कॉम्प्लेक्समधील इमारतीच्या १७व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली होती. मुंबईतील आगीचे प्रकरण ज्वलंत असताना आता मुंबईतल्या अंधेरीतील लोखंडवाला (Lokhandwala) परिसरात एका इमारतीला भीषण आग (Fire News) लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोखंडवाला परिसरातील एका इमारतीत दहाव्या मजल्यावरील एका घरात आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे या आगीत घरात राहणारे दोन वृद्ध आणि घरातील नोकराचा मृत्यू झाला.

दरम्याम, या आगीत काही जण अडक्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच आग लागण्याचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. परंतु पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags: mumbai fire

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

10 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

52 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

55 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago