Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव मैदानात उतरणार! २४ वर्षांनंतर होणार टीम इंडियाचा कर्णधार

Share

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) २४ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकदा टीम इंडियाचे (Team India) नेतृत्व करणार (Captain) आहे. सचिनला इंटरनॅशनल मास्टर्स लीगमध्ये (International Masters League) टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साह उसळला आहे. या विशेष लीगची सुरुवात १७ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये (DY Patil Stadium) भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.

२००० साली सचिनने शेवटचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कर्णधारपद सौरव गांगुलीकडे सोपवल्यानंतर, आता तब्बल दोन दशकांनंतर सचिन पुन्हा भारतीय टीमचं नेतृत्त्व करणार आहे. त्याच्यासाठी आणि चाहत्यांसाठी ही मोठी संधी आहे कारण सचिनला पुन्हा एकदा मैदानावर नेतृत्व करताना पाहण्याचा आनंद मिळणार आहे. लीगमध्ये भारतासह प्रमुख देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

श्रीलंकेच्या संघाचे नेतृत्व कुमार संगकारा करणार असून, ऑस्ट्रेलियाकडून शेन वॉटसन, दक्षिण आफ्रिकेकडून जॅक कॅलिस, इंग्लंडकडून इयॉन मॉर्गन आणि वेस्ट इंडिजकडून ब्रायन लारा कर्णधारपद सांभाळणार आहेत. भारतात होणाऱ्या या लीगमध्ये अनुभवसंपन्न खेळाडू पुन्हा एकदा आपल्या कौशल्यांचा जलवा दाखवणार आहेत. इंटरनॅशनल मास्टर्स लीग ही क्रिकेटप्रेमींसाठी अनोखी पर्वणी ठरणार आहे. त्यात विश्वचषक विजेते, महान फलंदाज आणि अनुभवी कर्णधार पुन्हा एकदा एकत्र येऊन आपलं कौशल्य दाखवणार आहेत.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

8 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

28 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

48 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

50 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago