मुंबई: भारत आणि बांग्लादेश यांच्यात कानपूरमध्ये खेळवण्यात आलेला सामना अनेक कारणांमुळे ऐतिहासिक ठरला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला ७ विकेटनी हरवले. पहिल्या तीन दिवशी मुसळधार पावसामुळे वाया गेले. मात्र शेवटच्या २ दिवसांत भारताने असा खेळ केला की कानपूरमध्ये एखादा कसोटी सामना खेळवला जात असे वाटलेच नाही. आता भारत असा पहिला देश बनला आहे ज्याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणतेही मेडन ओव्हर न खेळता विजय मिळवला.
क्रिकेटमध्ये असे आधीही घडले आहे की जेव्हा एखाद्या संघाने मेडन ओव्हर खेळता सामना जिंकण्याची कामगिरी केली. १९३९ मध्ये डरबनमध्ये खेळवण्यात आलेल्या इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात असे घडले होते. इंग्लंडने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या आणि इंग्लंडच्या फलंदाजांनी एकही मेडन ओव्हर टाकायला दिली नव्हती. हा साना इंग्लंडने एक डाव आणि १३ धावांनी जिंकला होता.
त्या सामन्यात इंग्लंडने दुसऱ्या डावात बॅटिंग केली नव्हती. यामुळे भारत असा पहिला देश बनला आहे ज्यांनी दोन्ही डावांत मेडन ओव्हर न टाकता कसोटी सामना जिंकला आहे. बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपला होता. तर सामन्यांच्या पहिल्या ३ दिवसांत पाऊस झाला होता. मात्र त्यानंतरही टीम इंडियाने जोरदार बॅटिंग केली आणि ३४.४ षटकांत २८५ धावा केल्या होत्या.तर दुसऱ्या डावात भारताला ९५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताने हे आव्हान १७.२ षटकांत पूर्ण केले होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…