मुंबई: मुंबईच्या अटल सेतुवर एका व्यक्तीने आपली गाडी उभी करत समुद्रात उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की त्या व्यक्तीने आपली कार ट्रान्स हार्बरवर पार्क केल्यानंतर तेथून उडी मारली.
न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार ही घटना सकाळी १० वाजता घडली. या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन केले. मात्र त्या व्यक्तीचा अद्याप शोध लागलेला नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही व्यक्ती एसयूव्ही घेऊन पूलावर आली. गाडीला त्यांनी साईनबोर्डाकडे उभे केले आणि समुद्रात उडी घातली.
अटल सेतुला मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या रूपामध्येही ओळखले जाते. यामुळे दक्षिण मुंबईला नवी मुंबईशी जोडता येते. या पुलाचे उद्घाटन या वर्षी जानेवारीत करण्यात आले होते. सहा लेनचा हा पूल २१.८ किमी लांब आहे आणि १६.५ किमी सी लिंकवर आहे.
अटल सेतुवर याआधीही अशा घटना समोर आल्या आहेत. येथे लोकांनी समुद्रात उडी मारत आपला जीव दिला आहे. गेल्या जुलै महिन्यात मुंबईत आर्थिक तंगीने त्रस्त झाल्याने ३८ वर्षीय इंजीनियर श्रीनिवासने अटल सेतुवरून समुद्रात उडी मारली होती. या व्यक्तीचा मृतदेहही आढळला नव्हता.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…