Heavy Rain : परतीच्या पावसाने आणले बळीराजाच्या डोळ्यात पाणी!

Share

मुसळधारेने हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

मुंबई : राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे राज्यातील बळीराजा चिंतेत आला आहे. या पावसामुळे राज्यातील हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यामध्ये अक्षरश: पाणी आले आहे. लवकरात लवकर शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

२ दिवस झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. २४ व २५ सप्टेंबर रोजी पडलेल्या पावसामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांतील ३२९९७.३० हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. सोयाबीन पिकाचे जास्त नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे.

हातातोंडाशी आलेले पीक गेले वाया

पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यामुळे बळीराजा चिंतेत आला आहे. अशामध्ये सरकारने लवकरात लवकर नुकसानग्रस्त भागांची पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

कोणत्या भागात किती झाले नुकसान?

बीडमध्ये ८ हजार हेक्टर, धाराशिवमध्ये ७ हजार हेक्टर, नांदेडमध्ये ५ हजार हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४ हजार ५०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. मराठवाड्यानंतर सांगली जिल्ह्यात नुकसानीची तीव्रता जास्त आहे. सांगलीत ४ हजार ८६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापुरात ३ हजार २०० हेक्टर, पुण्यात ४३० हेक्टर, अहमदनगरमध्ये ९१६ हेक्टर, जळगावात ३१७ हेक्टर, नाशिकमध्ये २५ हेक्टर, धुळ्यात १ हजार ७० हेक्टर आणि पालघरमध्ये ५५.८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे

Tags: heavy rain

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

29 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

2 hours ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

2 hours ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

3 hours ago