दह्यामध्ये मीठ टाकून खात असाल तर थांबा, होऊ शकते मोठे नुकसान

Share

मुंबई: दही प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे डाएटमध्ये दह्याचा नियमितपणे समावेश करावा. दह्यामध्ये आपल्या पोटासाठी फायदेशीर असलेले बॅक्टेरिया असतात जे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले आणि इम्युनिटी मजबूत राहते.

दह्यामध्ये काही लोक साखर तर काहीजण मीठ घालून खातात. जर तुम्ही दह्यात मीठ टाकून खात असाल तर तुम्ही हे ही जाणून घेणे गरजेचे आहे की असे केल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.

आयुर्वेदानुसार दह्यामध्ये कधीही मीठ घालून खाऊ नये. तुम्ही दह्यामध्ये साखर, गूळ अथवा कोणतीही गोड गोष्ट मिसळू शकता मात्र मीठ घालून खाल्ल्याने त्याचे शरीरास फायदे होत नाहीत.

दह्यामध्ये जर तुम्ही अधिक मीठ टाकून खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिज्मवर होऊ शकतो. यामुळे दह्यात मीठ घालून खाऊ नये. दह्यामध्ये पोटासाठी फायदेशीर असे लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया असतात ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो.

आयुर्वेदानुसार जर आपण दह्यामध्ये मीठ टाकतो तर हे बॅक्टेरिया मरून जातात. त्यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच होते. मात्र जर तुम्हाला दही साखरेशिवाय मीठ टाकून खायचे असेल तर साधे अथवा काळे मीठ टाकण्याऐवजी सैंधव मीठ घाला.

आयुर्वेदात हे ही सांगितले आहे की दही नुसतेच खाऊ नये तर दह्यामध्ये साखर, मध अथवा गूळ मिसळून खावे. सोबतच रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये. दह्यामधील गोडवा आणि आंबटपणा यामुळे त्यात म्युकस निर्माण होऊ शकतात यामुळे श्वासासंबंधी त्रास अथवा आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.

Tags: curdhealth

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

10 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

53 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

55 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago