Jio, Airtel Down : अरे! जिओ आणि एअरटेलचे विसर्जन झाले की काय? नेटवर्क गायब, नेटीझन्सकडून संताप; तासाभरातच १० हजार तक्रारी

Share

मुंबई : देशभरात गणपती बाप्पांच्या विसर्जनाच्या मिरवणुकांची धूम पाहायला मिळत असताना मुंबईत मात्र एअरटेल आणि जीओचे नेटवर्क ठप्प झाले. मुंबईत (Mumbai) आणि महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून मुंबईतील बाप्पांच्या विसर्जनाची मिरवणूक टीव्हीवर आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईलवर पाहिली जात आहे. मात्र, विसर्जनासाठी लालबागचा राजा मंडपातून बाहेर पडण्याचा उत्सव सुरू असतानाच मुंबईत जिओचं (Jio) नेटवर्क बंद झाल्याने नेटीझन्सने संताप व्यक्त केला. त्यातच एअरटेल (Airtel) चे नेटवर्कही कोलमडल्याने सोशल मीडियावरही नेटीझन्सकडून चांगलेच ट्रोल करण्यात आले.

नेटवर्क व्यत्ययांमुळे संपूर्ण भारतातील Jio आणि Airtel च्या वापरकर्त्यांना फटका बसला, ज्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तक्रारींचा पाऊस पडला.

मुंबईत जिओचे नेटवर्क अचानक डाऊन झाल्याने सोशल मीडियातून नेटीझन्सने जिओसह अंबानींना ट्रोल केले. तर, अनेकांनी तक्रारी देखिल दाखल केल्या आहेत. जिओचे नेटवर्क गायब झाल्याने ना फोन कॉल्स सुरू होते, ना इंटरनेट सेवा, त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

सर्वर डाऊन संदर्भात रिपोर्ट देणा-या वेबसाईट डिटेक्टरवर जाऊन माहिती घेतली. त्यानुसार, १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११.१५ नंतर दुपारी १२.३० वाजेपर्यंत नेटवर्क डाऊन झाल्याचे निदर्शनास आले. जिओ सर्व्हर डाऊनबाबत तब्बल १० हजार ३६७ तक्रारी दाखल झाल्या होत्या.

दरम्यान, जिओ नेटवर्कसह जिओ फायबर आणि ब्रॉडबँड सर्व्हिसमध्येही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. सोशल मीडियावर नेटीझन्सने याबाबतही उल्लेख केला आहे.

दरम्यान, तासाभरातच जिओ नेटवर्क पुन्हा सुरू झाले असून, याबाबत जिओकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर #Jiodown हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.

दरम्यान, एअरटेल वापरकर्त्यांना कनेक्टिव्हिटीच्या समस्या देखील आल्या, दुपारी १ वाजेपर्यंत १३० पेक्षा जास्त आउटेज रिपोर्ट दाखल झाले.

आउटेज डेटाच्या विश्लेषणातून असे दिसून आले की Jio-संबंधित तक्रारींपैकी एक महत्त्वपूर्ण भाग ‘नो सिग्नल’ बद्दल होता, जे अहवालांपैकी ६८ टक्के होते. मोबाइल इंटरनेट समस्यांपैकी १८ टक्के तक्रारी होत्या, तर १४ टक्के तक्रारी JioFibre सेवांशी संबंधित होत्या.

एअरटेल वापरकर्त्यांसाठी, समस्या प्रामुख्याने सिग्नल गमावणे, मोबाइल इंटरनेट व्यत्यय आणि संपूर्ण सेवा ब्लॅकआउटशी संबंधित होत्या.

याउलट, Vodafone Idea आणि BSNL द्वारे ऑपरेट केलेले नेटवर्क सामान्यपणे कार्य करत असल्याचे दिसले. डाउनडिटेक्टरच्या डेटाने सूचित केले आहे की समस्या Jio आणि Airtel वापरकर्त्यांसाठी वेगळ्या होत्या.

अद्यापपर्यंत, Jio किंवा Airtel या दोघांनीही या आउटेजेसच्या कारणासंबंधी विशिष्ट तपशील किंवा निराकरणासाठी अंदाजे टाइमलाइन प्रदान केलेली नाही. वापरकर्ते टेलिकॉम प्रदात्यांच्या अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत की ते सामान्य सेवा पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा करत आहेत.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

22 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

25 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

45 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago