पुणे : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशभरात अनेक मार्गांवरुन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरु करण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेसचा सुपरफास्ट प्रवास पाहता पुणेकरांनी देखील वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली होती. ही मागणी अखेर पूर्ण झाली असून लवकरच पुण्यातही वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १५ सप्टेंबरपासून हुबळी-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार आहे. त्यामुळे आता पुणेकरांचा सांगलीपर्यंतचा तासाभरात पार शक्य होणार आहे. याआधी पुणे ते सांगली प्रवासादरम्यान तीन तास लागत होते. मात्र वंदे भारतमुळे हा प्रवास अवघ्या ५५ मिनिटांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुणेकरांच्या वेळीची चांगलीच बचत होणार आहे.
हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस हुबळीहून पहाटे पाच वाजता सुटणार आहे. ती बेळगावला सहा वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. मिरजेला सकाळी नऊ वाजून १५ मिनिटांनी, सांगलीमध्ये सकाळी साडेनऊ वाजता आणि सातारा येथे १० वाजून ३५ मिनिटांनी दाखल होईल. पुण्यात दुपारी दीड वाजता गाडी पोहोचेल. पुण्याहून हुबळीला जाणारी गाडी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटेल. सांगलीत सहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल, तर हुबळीत ही गाडी रात्री पावणे अकरा वाजता पोहोचेल.
दरम्यान, या सर्व वंदे भारत एक्सप्रेस १५ सप्टेंबर रोजी सुरु होणार असून झारखंडमधील जमशेदपूर येथे एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी या गाड्यांचे उद्घाटन करणार आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…