BSNLचा जबरदस्त प्लान, दररोजी २ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Share

मुंबई: देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्जचे दर वाढवल्यानंतर आता हजारो युजर्स बीएसएनएलच्या दिशेने आकर्षित होत आहे. अशातच बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लान्स सादर केले आहेत. देशात बीएसएनएलने आपले नेटवर्क वेगाने वाढवण्याचे काम सुरू केले आहे.

मार्च २०२५ पर्यंत देशभरात बीएसएनएल ४जी सर्व्हिस सुरू होईल. अशातच आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या नव्या प्लानबद्दल सांगत आहोत ज्यात तुम्हाला दररोज २ जीबी इंटरनेट डेटा सोबतच अनलिमिटेड कॉलिंगही मिळत आहे. सोबतच याची व्हॅलिडिटी ५ महिन्यांपर्यंत आहे.

बीएसएनला ४०० रूपयांपेक्षा कमीचा प्लान

बीएसएनएलच्या प्लानची किंमत ३९७ रूपये आहे. हा प्लान त्या लोकांसाठी शानदार मानला जात आहे ज्यांना सेकंडरी सिम म्हणून बीएसएनएलचे कार्ड वापरायचे आहे. या स्वस्त प्लानची व्हॅलिडिटी ५ महिन्यांची आहे. म्हणजे एकदा रिचार्ज केल्यावर १५० दिवसांपर्यंत रिचार्ज करावे लागणार नाही.

मिळतात हे फायदे

बीएसएनएलच्या ३९७ रूपयांच्या प्लानमध्ये युजर्सला अनेक फायदे मिळतात. या प्लानमध्ये युजर्सला ३० दिवसांसाठी अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ कोणत्याही नेटवर्कवर तुम्ही कॉल करू शकता. दरम्यान कंपनी युजर्सला १५० दिवसांपर्यंत फ्री इनकमिंग कॉल्सची सुविधा देते. म्हणजेच हा प्लान खरेदी केल्यानंतर तुम्हाला नंबर बंद होण्याचे टेन्शन नाही.

या प्लानमध्ये तुम्हाला पहिल्या ३० दिवसांपर्यंत दररोज २ जीबी डेटा वापरायला मिळेल. सोबतच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा िळते. डेटा लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 40Kbps चा स्पीड मिळेल. या प्लानमध्ये दररोज १० फ्री एसएमएस मिळतात.

Tags: bsnl

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

32 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago