मुंबई : आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जात आहे. वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज झाली आहेत. मात्र, याच दहीहंडीच्या उत्सवात काही वेळेस उंच थरांवरुन पडून गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. या कारणामुळे गेल्या काही वर्षांत गोविंदा जखमी होऊन मरण पावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता एक हेल्पलाऊन क्रमांक देण्यात आला आहे. जखमी गोविंदांसाठी या क्रमांकावर संपर्क साधल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे.
डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने जखमी गोविंदांसाठी इमर्जेंसी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यासाठी कोणत्याही गोविंदाला ऑर्थोपेडिक किंवा मेंदूला दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका सेवासाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर 7506274959 वर कॉल करण्याचे आवाहन एम्सने केले आहे.
मुंबई आणि ठाणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या दहीहंड्यांना काही वेळापूर्वी सुरुवात झाली असून, मुंबईकरांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज मुंबई परिसरातील विविध दहीहंड्यांना उपस्थित राहणार आहेत. तर भाजपने ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात कमळ दहीहंडीचे आयोजन केले आहे. दरम्यान भांडुपमध्ये मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान पथकाने नऊ थरांची सलामी दिली आहे. मनसेचे मोहन चिरात यांनी या दहीहंडीचे आयोजन केले आहे.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…