सांस्कृतिक समृद्धीची गरज

Share

मायभाषा – डॉ. वीणा सानेकर

‘ऋचा’ या अनियतकालिकांचा कवी अरुण कोलटकर विशेषांक, या अंकाचे एक संपादक रमेश पानसे यांनी माझ्या हाती ठेवला, तो निश्चितच माझ्याकरिता अविस्मरणीय क्षण होता. या एका बिंदूतून मग मनात विचारांची आवर्तने
सुरू झाली.

मराठीतील अनियतकालिकांची चळवळ १९६० मध्ये उभी राहिली. हा प्रस्थापित वाड्.मयीन सत्तेला एक जोरदार धक्का होता. या अनियतकालिकांनी साहित्यविश्वात चौकटीबाहेरचा नि नवा विचार करणारे लेखक, संपादक, वाचक घडवले. ही चळवळ उभी राहिली तशी विझलीही!

अनियतकालिके असोत वा नियतकालिके यांनी मराठीत एक सकस वाड्.मयीन वातावरण निर्माण करण्यास मोलाचे योगदान दिले.

नियमित कालावधीनंतर प्रकाशित होणाऱ्या नियतकालिकांची वाट पाहणारा, त्या त्या नियतकालिकांचा वाचकवर्ग होता. १९३५ नंतरच्या काळात नि आजतागायत विविध विषयांना वाहिलेली नियतकालिके प्रकाशित झाली. अस्मितादर्श, नवभारत, समाजप्रबोधनपत्रिका, आलोचना, अनुष्टुभ, ललित, अभिधा, ऐवजी, खेळ, मुक्त शब्द, शब्दरूची, परिवर्तनाचा वाटसरू, साधना अशा विविध नियतकालिकांनी स्वत:चा वाचकवर्ग निर्माण केला.

१९९० नंतर आपण सर्वदूर समाजात फार मोठे बदल अनुभवत आहोत. भौतिक समृद्धीचा टोकाचा अट्टहास हे या काळाचे फार मोठे वैशिष्ट्य होय. या अट्टहासाची अनेक रूपे आहेत. मॉल्स, हॉटेलिंग, रिसॉर्ट, खरेदी एक ना दोन. माणसांच्या वस्तू झाल्या नि वस्तूंनी आयुष्यच ताब्यात घेतले.

अभौतिक व सांस्कृतिक समृद्धीचा आपल्याला जणू काही विसर पडला. सांस्कृतिक खुणांचा मागोवा घेताना वाड्.मयीन नियतकालिके व अनियतकालिकांना वगळता येत नाही. पण आज बंद पडत चाललेल्या मराठी शाळांना जसा वाली उरलेला नाही तसा बंद पडण्याच्या मार्गावरील नियतकालिकांचे कुणाला फारसे सोयरसुतक नाही. बंद पडलेल्या नियतकालिकांकरिता अस्वस्थ झालेली माणसेही आता संपत चालली. सांस्कृतिक समृद्धी ही समाजाची खरी ओळख असते हेही समाज विसरत चालला आहे.

वास्तविक प्रत्येक घरात एक तरी नियतकालिक प्रत्येक महिन्याला यायला हवे, पण त्याकरिता वाचक या नात्याने त्याचे वर्गणीदार वाढायला हवेत. सहजगत्या घरात पिझ्झा मागवला जातो, या किमतीत वर्षभराच्या एखाद्या नियतकालिकाची वर्गणी सहज मावते, पण हा खर्च मराठी माणसाला निरर्थक वाटतो की काय? एका तरी मासिकाची, नियतकालिकाची वर्गणी भरणे, महिन्याला एक मराठी पुस्तक विकत घेणे हे आपल्याला शक्य आहे. त्याची मराठी माणूस म्हणून आतून गरज वाटेल, तो सुदिन!

तूर्तास पुन्हा एकदा ‘ शिक्षणवेध’सारखे अत्यंत गुणवत्तापूर्ण मासिक नव्या रूपात १५ ऑगस्ट २०२४ रोजी वाचकांसमोर आले आहे, याचा अत्यानंद आहे.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

32 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

55 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago