वयाच्या ५०व्या वर्षापर्यंत तरूण दिसायचे आहे तर रोज करा हे काम

Share

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला नेहमी सुंदर आणि तरूण दिसायचे असते. मात्र हे शक्य नाही. कारण जसजसे वय वाढत जाते तसतसे चेहऱ्यावर वय दिसू लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या, फाईन लाईन्स आणि स्किन पातळ होत जाणे हे वय वाढत असल्याचे संकेत आहेत. मात्र तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही गोष्टींचा समावेश करून दीर्घकाळ तरूण राहू शकता.

हेल्दी डाएट आहे गरजेचे

हेल्दी डाएट तुम्हाला दीर्घकाळ तरूण आणि फिट ठेवू शकते. तुमच्या डाएटमध्ये फळे, हिरव्या भाज्या, सुका मेवा, बिया तसेच डेअरी उत्पादनांचा समावेश केला पाहिजे. खासकरून ३० वयानंतर तुम्हाला दररोज पोषणने भरलेल्या आहाराचे सेवन केले पाहिजे. जेव्हा तुम्ही व्हिटामिन, मिनरल आणि फायबरयुक्त गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करता तेव्हा त्वचा आतून निरोगी राहते आणि वय वाढल्याची लक्षणेही दिसत नाहीत.

दररोज व्यायाम करा

जर तुम्हाला स्वत:ला फिट ठेवायचे असेल तर दररोज एक्सरसाईज करा. अॅक्टिव्ह लाईफस्टाईलमुळे तुम्ही दीर्घकाळ स्वत:ला तंदुरुस्त ठेवू शकता. दररोज कमीत कमी ३० मिनिटे व्यायाम गरजेचा आहे. ज्यांच्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नाही ते घरातच हलकाफुलका व्यायाम करू शकतात. वॉक, योगा तसेच सायकलिंग करून तुम्ही स्वत:ला फिट ठेवू शकता.

ताण घेऊ नका

अधिक ताण अथवा चिंता तुम्हाला लवकर म्हातारे बनवू शकते. तणाव हा सायलेंट किलरप्रमाणे असतो जो तुम्हाला आतून पोकळ बनवतो. तुम्हाला दीर्घकाळ तरूण राहायचे असेल तर तणाव घेऊ नये.

भरपूर झोप

हेल्दी शरीर आणि त्वचेसाठी झोप अतिशय गरजेची आहे. जर तुम्ही पुरेशी झोप घेत नसाल तर त्यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. चांगली झोप तुमचे वय वाढण्याचा स्पीड कमी करते.

Tags: Skin Care

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

29 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago