Ravindra Waikar : नवी मुंबई एअरपोर्टला दी.बा.पाटील नाव द्या!

Share

खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

नवी मुंबई : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यातील विमानतळ विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट्स सांगितले. त्यामध्ये नवी मुंबई येथे विमानतळ उभारण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मुंबई विमानतळावरील विमानांचा ताण कमी करण्यासाठी नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) बांधकाम सुरु करण्यात आले. दरम्यान, सध्या हे बांधकाम प्रगतीपथावर सुरु असून याबाबत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यातच खासदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाबाबत मागणी केली असल्याची माहिती मिळत आहे.

खासदार रवींद्र वायकर यांनी नवी मुंबईतील विमानतळाला ‘दी.बा.पाटील’ नाव देण्याची मागणी केली आहे. या विमानतळाचे काम कधी पूर्ण होणार याबाबतची स्पष्टता अद्यापही मिळाली नाही. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार या विमानतळाला दि. बा. पाटील नाव देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठवला आहे, तो मंजूर करून विमानतळाला दि .बा.पाटील नाव देण्यात यावे, अशी मागणी केली. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाच्या विकासासाठी प्राधान्य द्यावे, अशी विनंती देखील वायकर यांनी केली आहे.

दरम्यान, या विमानतळाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असून त्याचा व्यावसायिक वापर मार्च २०२५ पासून होण्याच्या तयारीत आहे. तर २०४० पर्यंत या विमानतळाचे पाचही टप्पे कार्यान्वित होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

8 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

23 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago