नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्टला केरळच्या वायनाडमध्ये भूस्सखलन प्रभावित ठिकाणांचा दौरा करणार आहेत. पंतप्रधान हवाई सर्वेक्षण करणार आहेत. वायनाडमध्ये भूस्सखलनामुळे तब्बल ३०० लोकांचा मृत्यू झाला.
३० जुलै २०२४ला केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्सखलन झाले. ४२० लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे. तर १५० जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याशिवाय कमीत कमी २७३ जण जखमी झाले.
सैन्यदलाचे जवान, एसओजी अधिकारी आणि वन अधिकाऱ्यांची विशेष टीम जंगलातील सूजीपारामध्ये सनराईज व्हॅलीमध्ये तपास अभियान सुरू आहे.
३० जुलैनंतर सुरू झालेले दहा दिवसांच्या बचाव अभियानानंतर भारतीय सैन्य दल लवकरच वायनाडमधून परतण्यासाठी तयार आहे. सैन्य दल हे बचाव अभियान एनडीआरएफ, एसडीआरएफ, फायर फोर्स आणि केरळ पोलिसांकडे सोपवणार आहे.
एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना केरळचे मुख्यमंत्री म्हणाले की राज्याने केंद्र सरकारला ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती असल्याचे जाहीर करण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आतापर्यंत ४२० मृतदेहांचे पोस्टमार्टेम करण्यात आले आहे आणि वायनाडमध्ये तपास तसेच बचाव अभियान सुरू आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…