लखनऊ: उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये दहा वर्षाच्या एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूनंतरही त्याच्या आईने माणुसकीचे दर्शन घडवले आहे. महिलेने त्या ११ वर्षाच्या मुलाला माफ केले ज्याच्यामुळे तिच्या काळजाचा तुकडा तिने गमावला होता.
कानपूरमध्ये क्रिकेट खेळत असताना नो बॉलवरून मुलांमध्ये वाद झाला. यावेळेस चिडलेल्या मुलाने रागाच्या भरात त्या महिलेच्या मुलाला बॅटने मारले. यात त्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईला दुसऱ्या मुलाच्या विरोधात पोलिसांकडे केस दाखल करण्याचा सल्ला दिला मात्र तिने असे केले नाही.
आरोपी मुलाच्या आईच्या वेदना समजून घेत मृत मुलाच्या आईने आरोपीविरुद्ध रिपोर्ट लिहिण्यास नकार दिला. ती म्हणाली खेळताना वादविवाद तर होतातच त्या मुलाने जाणून बुजून माझ्या मुलाला मारले नव्हते.
ही संपूर्ण घटना रविवार सकाळची आहे. जाजमऊ परिसरात केडीए कॉलनीमध्ये राहणारा १० वर्षांचा आरिज आपल्या परिसरातील मित्रांसोबत एकता पार्कमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. तो बॉलिंग करत होता तर दुसरा मुलगा बॅटिंग करत होता. यावेळेस नो बॉलवरू त्यांच्यात वाद झाला. यावेळेस बॅटिंग कऱणाऱ्या ११ वर्षाच्या ुलाने आरिजला बॅटने मारले. त्याने इतके जोरात मारले की आरिज बेशुद्ध झाला. आरिजला रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे मृत घोषित केले.
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…