मोड आलेल्या कडधान्यांची
गोष्ट सांगते आई
कडधान्यांच्या उसळीबद्दल
सांगते बरंच काही
तोंडाला चव नसेल तर
म्हणते एक गोष्ट करावी
चमचमीत उसळीची चव
एकदा तरी घ्यावी
मोड आलेली कडधान्ये
पचायला असतात हलकी
चवीलासुद्धा मस्त म्हणे
आहारात हवीत नेमकी
वाल, हरभरा, मूग, मटकी
हुलगा, वाटाणा, मसूर
तूर, घेवडा, चवळी, उडीद
कडधान्ये आहेत भरपूर
मुबलक त्यात प्रोटिन्स
जीवनसत्त्वेही खूप
पचनक्रिया सुधारून
बाळसे धरते रूप
मोड आल्यावर त्यांना
ती आणखी उपयोगी होती
उत्तम तब्बेतीसाठी
आरोग्यदायी ती ठरती
आई नुसते बोलत नाही
साऱ्यांसाठी करते किती
कडधान्यांच्या केवढ्या
तिला येतात पाककृती
१) डोंगरावरील खडकातून
जन्माला आली
गुळगुळीत, सुंदर
काळी काळी झाली
श्रीगणेशा तिच्यावरच
काढला जाई
कोण बरं अ आ ई
गिरवून घेई?
२) शेतात राबतात
शेतकरी
तेव्हाच येतात ते
भूमीवरी
पिवळ्याधम्मक दाण्यांनी
खूप खूप हसतात
हिरव्या कपड्यात
दडून कोण बसतात?
३) इवलीशी साधीशी
तरी मोठी कामाची
अंधाराला पळवी
जरी असे मातीची
तेज नवे उधळण्याचे
सदा तिचे काम
आळसात बुडून कोण
करीत नाही आराम?
उत्तर –
१) पाटी
२) कणीस
३) पणती
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…