मुंबई: मुंबईचे हवामान पाहता पोलिसांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी म्हटले की हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. अशातच मुंबईकरांसाठी आवाहन आहे की गरज असेल तर घराबाहेर पडा. नाहीतर घरातच राहा. तसेच कोणत्याही प्रकारच्या आपातकालीन मदतीसाठी १०० अथवा १०२ डायल करून संपर्क करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरूवारी सकाळी चार वाजल्यापासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईतील अनेक भागांमध्ये १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. पीटीआयच्या माहितीनुसार या दरम्यान अधेरीच्या मालपा डोंगरी क्षेत्रात सर्वाधिक १५७ मिमी पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने पुढील २४ तासांत सकाळी आठ वाजल्यापासून शहर तसेच उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…