मुंबई : काल रात्रीपासून मुंबईसह महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार सरी कोसळत आहेत. अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली असून नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत. सलग पाच सहा दिवस पावसाच्या धारा (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे, सखल भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक सेवा देखील विस्कळीत झाली आहे. अशातच हवामान विभागाने पुढील पंधरा दिवस मुंबईत पावसाचे थैमान असेच कायम असणार असल्याचा अंदाज दिला आहे. त्यामुळे २६ जुलै २००५ साली निर्माण झालेल्या मुंबईपूराच्या कटू आठवणी डोळ्यांसमोर येऊन मुंबईकरांची चिंता आणखी वाढू लागली आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, आज मुंबईमध्ये ६० ते ७० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यासोबत मुंबईमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने पुढील दोन आठवडे कसा पाऊस पडणार आहे याचा अंदाज व्यक्त केला आहे. जाणून घ्या कसे असेल मुंबईतील वातावरण.
दरम्यान, हवामान संस्थेने दिलेला अंदाज पाहता मुंबईकरांचा पुढील दोन आठवडे पावसाचा प्रवास करावा लागणार असून गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आव्हान देखील केले आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…