सावळे आभाळ
गहिरे मेघ
उमटली गालावर
हसरी रेघ
उंच झाडे
हिरवीगार पाने
ओल्या मातीचे
मधुर तराणे
विशाल पर्वत
दाट हिरवळ
मंद हवेत
फुलांचा दरवळ
गाणारी नदी
नाचणारे पाणी
ओठावर फुलती
पाऊस गाणी
चैतन्य सारे
भरून उरावे
रोजचे दिवस
नवीन व्हावे
निसर्ग सखा
घालितो साद
साधू एकमेकांशी
सुखद संवाद
१) सर्कशीचा खरा प्राण
तोच आहे खरा
त्याच्याशिवाय खेळ
होत नाही पुरा
विचित्र पोशाखात
दिसे मजेदार
कोणत्या या वल्लीला
टाळ्या मिळती फार?
२) डोक्यावरी जेव्हा
फिरे तिचा हात
सुरकुतलेल्या हातांमध्ये
माया किती दाट
नंबर पहिला आला की
घेते अजून पापा
कोण बरं आपल्यासाठी
असते देवबाप्पा?
३) तो नसला की
झाडही रुसते
धरणीमाय तर
गप्पच बसते
तो आल्यावर पानं
वाजवतात टाळ्या
कुणाला झेलत
हसतात कळ्या?
१) विदूषक
२) आजी
३) पाऊस
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…