Asia Cup: भारताची सलग दुसऱ्या विजयासह सेमीफायनलमध्ये एंट्री

Share

मुंबई: भारतीय महिला संघाने सलग दुसऱ्या विजयासह आशिया कपच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. पाकिस्तानला हरवल्यानंतर यूएईविरुद्ध भारताने ७८ धावांनी मोठा विजय मिळवला. ऋचा घोषच्या तुफानी अर्धशतक आणि हरमनप्रीत कौरच्या कर्णधारीला साजेशी खेळीच्या जोरावर भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना यूएईविरुद्ध ५ बा २०१ धावसंख्या उभारली होती. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना यूएईचा संघ ७ बाद १२३ धावाच करू शकला.

महिला आशिया कपमध्ये भारताने यूएईविरुद्ध रविवारी मोठ्या विजयासह सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाने कर्णधार हरमनप्रीत कौरने कठीण वेळेस येता शानदार अर्धशतक ठोकले. यानंतर अखेरीस ऋचा घोषच्या विस्फोटक खेळीने संघाला दोनशे धावांचा टप्पा गाठून दिला. स्मृती मंधानाला या सामन्यात १३ धावा करता आल्या. तर शेफाली वर्माने ३७ धावांचे योगदान दिले. ३ विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने ४७ बॉलमध्ये ६६ धावांची खेळी केली.

ऋचा घोषचे तुफान अर्धशतक

सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऋचा घोषने केवळ २६ बॉलमध्ये ९ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने तुफानी अर्धशतक ठोकले. महिला आशिया कपच्या इतिहासात ऋचा टी-२० मध्ये अर्धशतक ठोकणारी पहिली विकेटकीपर बनली आहे. भारतीय संघाने स्पर्धेत २०० धावांचा स्कोर करत इतिहास रचला.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

21 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

25 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

39 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

58 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago