Mumbai Rain : सानपाडामधील भुयारी मार्गात पाणी तुंबले! वाहनचालकांचे प्रचंड हाल

Share

मुंबई : मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने (Mumbai Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना त्यातून पायवाट शोधून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचाही मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. सानपाडामधील (Sanpada) भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणात पाऊसपाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडामधील भुयारी मार्गात ४ फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना देखील या पाण्यातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी काढण्यासाठी देखील विलंब होत असल्याने काहीकाळासाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे भर पावसात या ठिकाणी आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

45 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

48 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago