मुंबई : जगातील मोठी संगणक कंपनी मायक्रोसॉफ्टबाबत (Microsoft) मोठी माहिती समोर येत आहे. गेल्या काही तासांपासून सर्व्हरमध्ये (Server) बिघाड झाला असून याचा फटका जगाला बसला आहे. बँकांपासून (Bank) एअरलाइनपर्यंतच्या (Airline) सर्व सेवा विस्कळीत झाल्यामुळे सगळीकडे गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच मायक्रोसॉफ्टचा वापर करणाऱ्या अनेक युजर्संच्या लॅपटॉप आणि कंप्यूटर्सच्या स्क्रिनवर एरर (Error) येऊ लागल्यामुळे युजर्समध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच करण्यात आलेल्या क्राउड स्क्रीम अपडेटनंतर ही समस्या सुरु झाली आहे. आज सकाळपासून क्लाउड सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक भागात समस्या निर्माण झाली आहे. मायक्रोसॉफ्टसोबत काम करणाऱ्या CrowdStrike ने ही समस्या मान्य केली आहे. तसेच मायक्रोसॉफ्टच्या अभियंत्यांनी ही समस्या निर्माण करणारी सामग्री शोधून काढली असून लवकरच ती दुरुस्त करून त्यांना पूर्ववत केले जाणार आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये अडथळा सुरू झाल्याने देशातील अनेक विमानतळांवर सर्व्हर डाऊनचा फटाका बसला आहे. दिल्ली आणि मुंबई विमानतळावर ही परिणाम झाला आहे. अनेक विमानांची उड्डाण रखडली आहेत. तिकीट बुकिंगपासून चेक इन पर्यंत वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान आलेल्या अडचणीमुळे सर्व विमान कंपन्यांनी प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये ‘आमच्या सिस्टमवर सध्या मायक्रोसॉफ्ट आउटेजचा परिणाम झाला आहे. त्यामुळे बुकिंगसह चेकइनवर याचा अडथळा येत आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत आहोत’, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…