मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत वातावरण अतिशय हिरवेगार तसेच आल्हाददायक असते. मात्र यादिवसांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे असते. या मोसमात अशा काही भाज्या खाऊ नयेत ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार सतावू शकतात. या भाज्यांमध्ये किटाणू तसेच बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे याचा पचनसंस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतात.
हिरव्या भाज्या जसे पालक, कोबी आणि सलाड सारख्या भाज्या लवकर दूषित होतात. यात किटाणू आणि किडे लवकर वाढतात. यामुळे पोटाशी संबंधित आजार होण्याचा धोका असतो त्यामुळे पावसाळ्यात या भाज्या खाऊ नयेत.
पावसाळ्यात मशरूम खाऊ नयेत. मशरूम ओलाव्यामुळे लवकर खराब होतात. यामध्ये हानिकारक बॅक्टेरिया तसेच विषारी पदार्थ वाढू शकतात. यामुळे पोटाच्या समस्या तसेच आजार वाढण्याची शक्यता असते. याऐवजी तुम्ही दुधी भोपळा, तोंडली, भोपळा या भाज्यांचे सेवन करू शकता.
पावसाळ्याच्या दिवसांत वांगी खाऊ नयेत. या मोसमात वांग्यामध्ये किडे तसेच बॅक्टेरिया लवकर वाढतात. यामुळे पाचनसंस्था बिघडू शकते.
फ्लावरमध्ये पावसामुळे छोटे छोटे किडे तसेच बॅक्टेरिया होतात. हे धुवून जात नाहीत. तसेच पावसाळ्यात फ्लॉवर खाल्ल्याने पोटात गॅस तसेच अपचनाचा त्रास होऊ शकतो.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…