Dengue : नाशकात डेंग्यूचे थैमान! आठवड्याभरात १०० हून अधिक जणांना प्रादुर्भाव

Share

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक आजार डोकावत असतात. अशातच नाशिक शहरात (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue) साथीने थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा तब्बल १०४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये सिडको विभागात ३७ रुग्ण तर नाशिकरोड विभागात २२ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६ रुग्ण, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ४६९ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. मात्र तरीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

डेंग्यूची लक्षणे

डेंग्यू ताप आल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला अचानक थंडी वाजून येते. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. अशक्तपणा, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणे, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

8 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

28 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

48 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

50 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago