Accident news : विठ्ठलदर्शनाला निघालेल्या भक्तांच्या बसला अपघात! ५ जणांचा मृत्यू

Share

८ जण गंभीर तर २० ते ३० जण किरकोळ जखमी

नवी मुंबई : आषाढी एकादशीला अवघा एक दिवस उरल्यामुळे राज्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले आहे. विठूनामाचा गजर करत वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. मात्र, यात एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या बसचा अपघात झाला आहे. यात ५ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी आहे, तर २० ते ३० जण किरकोळ जखमी झाले आहेत. डोंबिवलीवरून (Dombivli) पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर (Mumbai-Pune Expressway Highway) भीषण अपघात (Terrible Accident) झाला.

गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली असून सातत्याने अपघाताच्या चित्रविचित्रघटना समोर येत आहेत. त्यातच आता वारकऱ्यांच्या बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या बसमधून एकूण ५४ वारकरी प्रवास करत होते. डोंबिवलीवरुन हे सर्वजण विठ्ठलाच्या ओढीने पंढरीच्या दिशेने निघाले होते. पण वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरुन बस पंढरपूरच्या दिशेने जात असताना भीषण अपघात झाला.

वारकऱ्यांच्या बससमोर एक ट्रॅक्टर जात होता. बसवरचा चालकाचा ताबा सुटला आणि पुढे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर बस जाऊन आदळली. पुढे बस अनियंत्रित होऊन थेट ३० ते ४० फूट खड्ड्यात जाऊन पडली. यावेळी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं. सर्व जखमींना एमजीएम रूग्णालय आणि पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आलाच कसा? पोलीस यंत्रणा कार्यरत नाही का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

10 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

12 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

48 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

59 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago