WCL 2024 Final: टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा धुतले, लीजेंड्स लीग फायनलमध्ये दिली मात

Share

मुंबई: भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या पहिल्या हंगामाचा खिताब जिंकला आहे. युवराज सिंगच्या नेतृत्वात इंडियन चॅम्पियन्सने १३ जुलैला एजबेस्टन, बर्मिंगहॅम येथे खेळवण्यात आलेल्या फायनल सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सला ५ विकेटनी हरवले.

पाकिस्तानचा कर्णधार युनिस खानने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या संघाने २० षटकांत ६ बाद १५६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने हे आव्हान १९,१ षटकांत पूर्ण केले. अंबाती रायडूने ३० बॉलमध्ये ५० धावा ठोकल्या आणि भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरूवात चांगली झाली. सलामी फलंदाज रॉबिन उथप्पा आणि रायडू यांनी पॉवरप्लेमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच सामना केला. रायडूने पहिल्या ओव्हरमध्ये आमिर यामीनला चौकार-षटकार लगावत धमाकेदार सुरूवात केली.

 

पहिल्या विकेटसाठी रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायडू यांनी ३४ धावांची भागीदारी केली. उथप्पा ८ बॉलमध्ये १० धावा करून परतला. त्यानंतर अंबाती रायडू आणि गुरकिरत सिंह मान यांनी काळी वेळ भागीदारी केली. १२व्या षटकांत इंडिया चॅम्पियन्सला तिसरा झटका बसला. रायडू ३० बॉलमध्ये ५० धावा करून बाद झाला.

त्यानंतर गुरकिरत ३४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर संघाला पाचवा झटका १५० धावांवर बसला. येथे युसुफ पठाण बाद झाला. तो १९व्या षटकांत दुसऱ्या बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार युवराज सिंहने नाबाद १५ आणि इरफान पठाणने नाबाद ५ धावांची खेळी करत भारताला विजयपथावर आणले.

Recent Posts

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

4 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

3 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

4 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

4 hours ago