नाशिक : कांद्याचे दर वाढत चालल्याने देशातील व्यापाऱ्यांनी अफगणिस्तानातील लाल कांद्याची खरेदी करुन तो भारतीय बाजारात विक्रीला आणला आहे. अफगणिस्तानमध्ये लाल कांद्याचे दर कमी असल्याने तो कांदा आयात करुन भारतीय बाजारात महागड्या दरात विक्री करुन नफा कमविण्याचा उद्योग सुरु केला आहे. या प्रकाराचा मध्य प्रदेशातील कांदा उत्पादकांसह नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागला आहे.
कांद्यावर केंद्र सरकारने लागू केलेले ४० टक्के निर्यातशुल्क, ‘नाफेड’चा तटपुंजा भाव या सगळ्या घोळात आता अफगाणिस्तानचा लाल कांदा पाकिस्तानमार्गे भारतात दाखल होत आहे. भारतात कांद्याचे वाढत असलेले दर अन् अफगानिस्तानमध्ये घसरलेले दर याचा फायदा घेत खासगी व्यापारी तिकडील कांदा भारतात आणून मालामाल बनू पाहत आहेत.
अमृतसर अन् दिल्लीच्या बााजरपेठेत या कांद्याने आपले बस्तान बसविले असून, लवकरच तो इतर बाजारपेठ काबीज करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे राजस्थानचा कांदा संपल्याने दिल्लीत नाशिकसह मध्य प्रदेशचा कांदा अधिक प्रमाणात जाऊ लागला आहे. या कांद्याची स्पर्धा दिल्लीच्या बाजारात अफगाणिस्तानच्या कांद्याशी होत आहे.
कांदा भारत सरकारच खरेदी करीत असल्याची शक्यता देशातील कांदा उत्पादकांनी व्यक्त केली होती; परंतु अधिक माहिती घेतली असता कांदा खासगी व्यापारीच थेट खरेदी करीत असल्याचे सांगण्यात आले. दिल्लीच्या व्यापाऱ्यांनी पाकिस्तानच्या रस्त्याने अफगाणिस्तानचा कांदा आणला असून, २८ ते ३० रुपये किलो या भावाने तो पोच मिळाला आहे. तर भारतात कांद्याचे दर ४० ते ५० रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे तिकडील कांदा मोठ्या व्यापाऱ्यांना परवडणारा आहे; मात्र नाशिकसह इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी अफगाणिस्तानच्या कांद्याला परवानगी देऊ नये, अशी भूमिका मांडली आहे. दोन देशांमध्ये झालेल्या व्यापारी करारामुळे हा व्यवहार दोघा बाजूंच्या व्यापाऱ्यांना शक्य होत आहे; मात्र तिकडील कांदा जरी भारतात दाखल झाला असला तरी नाशिक, नगर, पुणे आणि मध्य प्रदेशातील कांदा गुणवत्तेने भारी पडत असल्याने आपल्याकडील कांद्यालाच जास्त मागणी असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमधील ४० टनाचा एक अशा पाच ट्रकमधून २०० टन कांदा दिल्लीसह अमृतसरमध्ये विक्रीसाठी आला आहे. त्यात अजून वाढ होऊ शकते. हा कांदा ग्राहकांना २६ ते ३२ रुपये किलो भावाने विकला जाण्याची शक्यता आहे. रस्त्याने ट्रकमधून कांदा आणण्यासाठी करासह ट्रकचे भाडे ७५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत देण्यात आले आहे. पाकिस्तानमार्गे वाघा बॉर्डर पास करून कांदा भारतात दाखल होत आहे.
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…