मुंबई : सध्या राज्यभरात आरक्षणाचा (Reservation) मुद्दा जोर धरत आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा शांतता मोर्चाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणात सगेसोयऱ्यांबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळण्याविषयी मागणी केली आहे, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, अशी मागणी ओबीसी समाजाने केली आहे. यामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे व यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र, विरोधक राज्य सरकारवर याबाबत टीका करत आहे. सत्तेत असूनही आरक्षण देऊ शकत नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी सरकारवर केला. यावर लोकसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनी वडेट्टीवारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
खासदार नारायण राणे म्हणाले, वडेट्टीवार कोण आहेत? विरोधी पक्षनेते ना? त्यांना विषय कळत नाही. गडचिरोलीचा आहे तो, त्याला आमदार आधी मी बनवलं. आता तो विरोधी पक्षनेता आहे. त्याच्यामुळे कशाने काय करता येतं? याचा त्याने अभ्यास करावा आणि मग बोलावं, असा घणाघात नारायण राणे यांनी केला.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…