पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था पार ढासळली आहे. दिवसागणिक हत्या, लूटमार व अपहरण, अशा घटना सतत वाढत आहेत. सोमवारी मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. ही महिला वेडसर होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
दुसरी घटना डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नवरा बायकोच्या किरकोळ वादातून एका महिलेने आपल्या साडेचार महिन्याच्या मुलीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्या महिलेने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. नवरा तिला फिरायला घेऊन जात नाही, यावरून या नवरा बायकोमध्ये खटके उडत असत.
काल तिचा नवरा मित्रांसोबत पुन्हा फिरायला गेल्यामुळे तिचा संताप अनावर झाला व तिच्याकडून ही आततायी घटना घडली. या दोन्ही प्रकरणी मनोर व कासा पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…