मुंबई: पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे चेहऱ्यावर ब्रेकआऊट्स, चिपचिपणे आणि खाज यासारख्या समस्या येऊ शकतात. या मोसमात ज्यांची स्किन सेन्सेटिव्ह असते त्यांना खूप प्रॉब्लेम होतो.
पावसाळ्याच्या दिवसांत स्किन अतिशय तेलकट होते. कधी ऊन, तर कधी पावसामुळे हवामान दमट होते. याच परिणाम स्किनवर होतो. यामुळे या मोसमात पिंपल्स आणि पुरळाची समस्या अधिक वाढते. चेहऱ्याची चमक कमी होते. अशातच त्वचेची योग्य काळजी घेणे गरजेचे असते. अशी घ्या काळजी
पावसाळ्याच्या दिवसांत चेहरा साफ करणे गरजेचे असते. दिवसांतून कमीत कमी दोन वेळा चेहरा स्वच्छ करा. चेहरा धुण्यासाठी नीम फेस वॉश, ग्रीन टी फेस वॉश आणि टी ट्री फेस वॉशचा वापर करा.
गुलाबपाण्याने चेहरा धुतल्यास चेहऱ्यावर नैसर्गिक चमक राहण्यास मदत होते. गुलाबपाण्याचा तुम्ही टोनर म्हणून वापर करू शकता. या मोसमात फेस क्रीमरऐवजी गुलाबजल लावण्याचा सल्ला दिला जातो.
जर तुमची त्वचा तेलकट असेल तर डस्टिंग पावडरचा वापर केला पाहिजे. असे न केल्यास चेहऱ्यावर येणारे अतिरिक्त तेल समस्या आणखी वाढवू शकतात.
पावसाळ्याच्या दिवसांत त्वचेचे मॉश्चरायजर मेंटेन ठेवण्यासाठी लाईफ फेस ऑईलची निवड करा. यामुळे पिंपल्स आणि पुरळाचा त्रास दूर होऊ शकतो.
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…