छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरावर दोन दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे (Drone) टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर नजर ठेवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रकारामुळे मनोज जरांगे यांच्यावर धोक्याचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा (Z Plus Security) द्यावी अशी मागणी सहकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र सतत मागणी करुनही प्रशासन कोणतीही हालचाल करत नसल्यामुळे मराठा बांधवांनी (Maratha Protesters) आक्रमक भूमिका धारण केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे पाटील राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी करत छत्रपती संभाजीनगरमधील मराठा बांधव आक्रमक झाला आहे. आज छत्रपती संभाजीनगरमधील केंब्रिज चौकात सकल मराठा समाजातर्फे रास्ता रोको करण्यात आला आहे. मात्र या आंदोलनामुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, अंतरवालीच्या सरपंचांच्या घरावर ड्रोनने घिरट्या घातल्याबाबत सरपंच पांडुरंग तारख यांनी माहिती देत जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली होती. तसे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. काल पांडुरंग तारख यांनी मागणीसाठी जालन्यातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे आता सरकार मनोज जरांगे यांना झेड प्लस सुरक्षा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…