मुंबई: भारताने टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. भारताने शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी हरवले. तब्बल १७ वर्षांनी भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे.
रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारताने इतिहास रचला.. या संघाने इतिहासात चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकला आहे. भारतीय संघाने शनिवारी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी मात दिली. या विजयासोबत १४० कोटी भारतीयांना सेलीब्रेशन करण्याची संधी दिली.
भारतीय संघाने २ वेळा वनडे वर्ल्डकप जिंकलाआहे. तर दोनदा टी-२० वर्ल्डकप(२००७, २०२४)खिताब जिंकला आहे. संघाने मागील वर्ल्डकप २०११मध्ये जिंकला होता. त्यानंतर १३ वर्षानंतर कोणताही वर्ल्डकप खिताब जिंकता आला नव्हता.
१७७ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका एक वेळेस १५ षटकांत ४ बाद १४७ इतक्या धावांवर होती. येथून त्यांचा विजय पक्का वाटत होता. मात्र भारतीय गोलंदाजांनी त्यांच्या जबड्यातून विजय खेचून आणला.
पहिल्यांदा विराट आणि रोहित यांनी एकत्र खेळताना वर्ल्डकप जिंकला आहे.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…