मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची पाऊले उचलत असते. काही दिवसांपूर्वीच आरबीआयने येस बँक (Yes Bank), आयसीआयसीआय (ICICI) बँक आणि उत्तरप्रदेशातील पूर्वांचल को-ऑपरेटिव्ह या बँकांनी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी त्यांच्यावर चांगलाच दणका (RBI Action) बसवला होता. त्यानंतर पुन्हा अशाच बँकेवर आरबीआयने मोठी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही सूचनांचे पालन न केल्याबद्दल आरबीआयने हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेड (HSBC) वर २९.६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि रुपी डिनोमिनेटेड को-ब्रँडेड प्रीपेड कार्डच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल HSBC बँकेवर हा दंड ठोठावण्यात आला आहे, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.
बँकेवर कारवाई करताना आरबीआयने म्हटले आहे की, वर्षापूर्वी आरबीआयकडून या बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले नसल्याचे आढळून आले. त्या संदर्भात बँकेला नोटीस बजावण्यात आली होती. त्यामध्ये बँकेला कारणे देण्यास सांगण्यात आले होते, या सूचनांचे पालन न केल्याने बँकेला दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आली होती.
त्यादरम्यान, बँकेने दिलेला प्रतिसाद, वैयक्तिक हजेरी दरम्यान दिलेले तोंडी उत्तर आणि बँकेने दिलेली अतिरिक्त माहिती लक्षात घेतल्यानंतर असे आढळून आले की, इतर गोष्टींबरोबरच, बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यासाठी आर्थिक दंड आकारणे आवश्यक होते.
आरबीआयला या बँकेने आपल्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा उद्देश नाही. आर्थिक दंड लादल्याने आरबीआय ने बँकेविरुद्ध सुरू केलेल्या इतर कारवाईचा बँकेच्या कोणत्याही व्यवहारावर विपरीत परिणाम होणार नाही. त्यासोबत या बँकेतील खातेदारांनाही बँकेचा कोणताही दंड भरावा लागणार नाही.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…