Rohit Sharma: इंग्लंडविरुद्ध शतक ठोकत रोहित शर्माने रचला इतिहास, असे कऱणारा पहिला भारतीय कर्णधार

Share

मुंबई: आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्डकप २०२४च्या(t-20 world cup 2024) दुसऱ्या सेमीफायनलमध्ये २७ जूनला भारताचा सामना इंग्लंडशी झाला. दोन्ही संघादरम्यान हा सामना गयानाच्या प्रोव्हिडन्स स्टेडियममध्ये झाला. या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. त्यांचा सामना आता फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. फायनलचा सामना २९ जूनला ब्रिजटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.

रोहितने अर्धशतक ठोकत रचला इतिहास

इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने शानदार अर्धशतक ठोकले. रोहित असा कर्णधार आहे ज्याने टी-२० वर्ल्डकपच्या नॉकआऊट सामन्यात ५० आणि त्याहून अधिक धावा केल्यात. रोहितने ३९ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे.

रोहितने या खेळी दरम्यान भारतीय कर्णधाराने ५००० धावा पूर्ण केल्या. असे करणारा तो पाचवा कर्णधार आहे. रोहितच्या आधी विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुली यांनी हे यश मिळवले होते.

विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर आहे. कोहलीने कर्णधार म्हणून एकूण२१३ सामन्यांमध्ये १२८३३ धावा केल्यात तर धोनी ११२०७ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर मोहम्मद अझरुद्दीन ८०९५ धावा आणि सौरव गांगुली ७६४३ धावा यांचा नंबर लागतो.

रोहित शर्माला २०२१मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर जानेवारी २०२२मध्ये विराट कोहली कसोटी कर्णधारापासून दूर झाल्यानंतर त्याला नेतृत्व सोपवण्यात आले.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

6 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

9 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

45 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

56 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago