रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED) जमीन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली. यानंतर पाच महिन्यांनी हेमंत सोरेन यांना झारखंड हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाकडून आज त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.
३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मधल्या काळात ते काही दिवस बाहेरही आले होते. आता तब्बल पाच महिन्यानंतर सोरेन यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.तेव्हापासून त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन पक्षाचे कामकाज पाहत आहेत. आता झारखंडमधील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिन्यात हेमंत सोरेन यांनी त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झाल्यामुळे १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र ईडी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…