Nilesh Rane : तुमच्यातील खरा माणूस अनेकांना समजलाच नाही!

Share

नारायण राणेंच्या शपथविधीनंतर निलेश राणेंची भावनिक पोस्ट

मुंबई : नारायण राणे (Narayan Rane) यांनी संसदेत खासदार म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांचे पुत्र कोकणातील भाजपा नेते व माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी एक भावनिक पोस्ट ‘एक्स’वर शेअर केली आहे. तुम्हाला सगळी पदे सहज मिळाली नाहीत, तुम्ही केलेला संघर्ष पाहिला, तुमच्यातला खरा माणूस अनेकांना कळलाच नाही, अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या. तसेच खासदारकीची पाच वर्षे जीव तोडून कोकणासाठी काम करणार असल्याचेही निलेश राणे यांनी सांगितले. भाजपाचे नवनियुक्त खासदार नारायण राणे यांनी संसदेत खासदारपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांचे पुत्र निलेश राणेंनी एक पोस्ट लिहून नारायण राणेंचा नगरसेवक, आमदार ते खासदारकीपर्यंतचा प्रवास मांडला.ढ़

काय आहे निलेश राणेंचे ट्वीट?

१९८५ नगरसेवक, १९९० ते २०१४ सलग सहा वेळा आमदार (१ पोटनिवडणूक), २०१४ ते २०२४ विधान परिषद १ वेळा, राज्यसभा १ वेळा आणि २०२४ आज लोकसभा खासदार. ही सगळी पदे सहज आली नाहीत, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला, ते बघणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. तुमचा खरा प्रवास आणि तुमच्यातला खरा माणूस अजून अनेकांना कळलाच नाही. तुम्हीच कधी कधी बोलता मी कसा इथंपर्यंत आलो, मलाच कळले नाही. पण तुम्हाला जरी नाही कळले तरी ते आम्हाला दिसले. इतकी लोकं इतके वर्षे जोडून ठेवणे सोपे नाही.

जीवनात सरळ काहीच मिळत नाही, हे आम्हाला समजले. तुम्ही कधीच कार्यकर्त्यांना बोलला नाही की निलेश, नितेशला सांभाळा. कारण तुम्ही दाखवलेल्या मार्गावर जो चालला, त्याला सांभाळायची गरज नाही. कोकणाने आणि खासकरून सिंधुदुर्गाने आपल्याला भरभरून प्रेम देले आणि म्हणून ही तुमची खासदारकीची पाच वर्षं जीव तोडून आम्ही सगळे कोकणासाठी काम करणार. तुम्ही आहात म्हणून हे सगळे शक्य आहे.

कोकणच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी समर्पित

रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी संसदेत खासदार पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर सोशल मीडियावर नारायण राणे यांनी व्यक्त होत कोकणच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करत असल्याचे स्पष्ट केले.

ते म्हणाले, आज १८व्या लोकसभेत लोकसभेचा खासदार म्हणून शपथ घेताना मला मोठा आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, मी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निरंतर विकासासाठी आणि विकसित भारताच्या उभारणीच्या ध्येयासाठी स्वत:ला समर्पित करण्याची शपथ घेतो.

जय हिंद!
जय महाराष्ट्र !!

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago