Tea Price Hike : ‘गरम चाय की प्याली’ महागली!

Share

चहाप्रेमींना द्यावे लागणार जास्तीचे पैसे; नेमके कारण काय?

मुंबई : सकाळचा वाफाळलेला चहा, हातात पेपर असे निवांत क्षण सर्वांनाच हवे असतात. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत सकाळची सुरुवात करत असतो. भारतातील लोकांना चहा प्यायला आवडतो. चहाचे उत्पादन (Tea production) आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत (India) हा अग्रगण्य देश आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक तर चीन पहिल्या क्रमांकावर येतो. जगभरातील देशांमध्ये प्रसिद्ध आणि स्वस्त पेय असण्याव्यतिरिक्त, चहा लोकांच्या जीवनात इतका एकरूप झाला आहे की त्याला वेगळे करणे अशक्य आहे. मात्र यंदा चहा महागल्याने (Tea Price Hike) प्रत्येक घोटासोबत लागणारे चटके अधिक तीव्र झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठया प्रमाणात आहे. परंतु यंदा चहा पिणेही खिशाला जड जाणार असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतीय चहा उद्योगाला प्रतिकूल हवामानामुळे चालू पीक वर्षाच्या जूनपर्यंत सहा कोटी किलोग्रॅम उत्पादनाची कमतरता भासत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यावेळी देशातील चहाचे उत्पादन कमी झाल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे चहाचे कमी होणारे उत्पादन उत्पादकांच्या महसुलावर परिणाम करेल आणि चहाच्या किमती आणखी वाढतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

सूर्यप्रकाशाचा अभावामुळे उत्पादनात घट

उत्तर भारतीय चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.

चहाचे उत्पादन ६ कोटी किलोने कमी

टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (ΤΑΙ) अध्यक्ष संदीप सिंघानिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, जूनपर्यंत चहा पिकाचे एकत्रित नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा कोटी किलोग्रॅम असू शकते.

‘इतक्या’ टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याचा अंदाज

टी बोर्ड ऑफ इंडियाने काढलेल्या आकडेवारीवरून, एप्रिल २०२४ पर्यंत आसाममध्ये चहाचे उत्पादन सुमारे ८ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १३ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर आसाममधील चहांच्या बागांमध्ये मे महिन्यातील उत्पादन २० टक्के तर पश्चिम बंगालमधील ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

1 hour ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago