भाईंदर : निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व ठिकाणी रखडलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे, विस्कळीत झालेले जनजीवन, वाहन चालक आणि नागरिक यांचे होणारे हाल प्रत्यक्ष अनुभवले. त्यानंतर थेट आयुक्तांशी संपर्क साधून तंबी दिल्यानंतर सिमेंट रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावे असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. मात्र डेड लाईन धुडकावत मीरा रोड येथे सिमेंट रस्त्यांचे खड्डे कायम असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.
सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी दिलेल्या कार्य आदेशाची मुदत पुर्ण होऊन आठ महिने झाले तरी मीरा रोड येथील पूनम गार्डन रोडचे सिमेंट काँक्रिटी करणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळा सुरू झाला तरी रस्त्यासाठी केलेला मोठा खड्डा तसाच पडून असल्याने तसेच पावसाळा सुरू झाल्याने त्यात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाहने आणि नागरिकांना कठीण प्रवास करावा लागत आहे.
निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व ठिकाणी रखडलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे,त्यामुळे नागरिकांना होणारा प्रचंड त्रास प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्यांनी आयुक्तांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी सिमेंट रस्त्यांची सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करून नागरिकांना रहदारीसाठी पूर्ववत करून देण्याचे आदेश दिले होते. परंतु ठेकेदार,महापालिका अभियंते यांनी आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यासोबत आयुक्तांनी दिलेली डेड लाईन उलटून २० दिवस झाले, तरीसुध्दा मीरा रोड येथील पुनम गार्डन रस्त्यावर सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी खणून ठेवलेला रस्त्या तसाच अर्धवट अवस्थेत पडून असल्याची तक्रार समाजसेवक नितीन नाईक यांनी आयुक्तांकडे केली असून नागरिकांना जीव मुठीत धरून जाण्यापासून मुक्तता देण्याची मागणी केली आहे.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…