Mumbai Rain : मुंबईकरांची तारांबळ! मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेला फटका

Share

मुंबई : अनेक दिवसांपासून लपंडाव खेळणाऱ्या पावसाने राज्यासह मुंबईत (Mumbai Rain) दमदार आगमन केले आहे. आज सकाळपासूनच मुंबईसह उपनगरांतही पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे संपूर्ण परिसरात गारवा पसरला आहे. त्यामुळे मुंबईकर सुखावले आहेत, मात्र याच पावसाचा फटका मुंबईकरांची लाईफलाइन असलेल्या रेल्वेलाही (Mumbai Railway) बसला आहे. सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मध्य (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसह इतर प्रवाशांची तारांबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे जिल्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यासोबत सकाळपासून पडणाऱ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. मुंबईत पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही मार्गांना फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम रेल्वे विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे मध्य रेल्वेवर ठाण्याहून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे सकाळी ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने कामाला जाणाऱ्या नोकरदारांना उशिरा ऑफिस गाठावे लागले.

पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने

मुसळधार पावसाचा पश्चिम रेल्वेलाही फटका बसला आहे. पश्चिम रेल्वेवरील वाहतूकही १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. विरारसहित पालघरमध्येही मुसळधार बरसणाऱ्या पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला आहे.

पावसामुळे डहाणू-विरार लोकल सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत. ट्रॅकजवळ पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची डहाणूपर्यंतची लोकल सेवा धीम्या गतीने सुरु आहे. तर पावसाचा जोर अजूनही कायम असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

कल्याण, बदलापुरात तुफान पाऊस

उल्हासनगर, अंबरनाथ ,बदलापूर आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये अनेक दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. कल्याणमध्ये मागील अर्ध्या तासापासून जोरदार पाऊस सुरू असल्याने काही रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. कल्याण पूर्व परिसरात रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस ही कोंडी काढण्यासाठी रस्त्यावर उतरल्याचे माहिती मिळत आहे.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

8 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

10 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

46 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

57 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago