IND vs ZIM: पुढील आठवड्यात टीम इंडियाची घोषणा!झिम्बाब्वेसोबत होणार मालिका

Share

मुंबई: आता टी-२० वर्ल्डकप २०२४(t-20 world cup 2024) संपलेला नाही मात्र भारताने जर ट्रॉफी जिंकली तर त्यांचे लक्ष झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेवर असेल. जुलै महिन्यात टीम इंडिया झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. येथे दोन्ही संघादरम्यान ५ टी-२० सामने खेळवले जातील. आता एका मीडिया रिपोर्टनुसार झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.

दरम्यान, लवकरच भारताला नवा प्रशिक्षक मिळमार आहे. अशातच मुख्य निवडप्रमुख अजित आगरकर या प्रकरणात कोचचा सल्लाही घेतील. असे सांगितले जात आहे की झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते.

रिपोर्ट्सनुसार टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाला नवी सुरूवात दिली जाऊ शकते. आयपीएल २०२४मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरूण खेळाडूंना १५ सदस्यीय संघात निवडले जाऊ शकते. दरम्यान, या विषयावर अद्याप स्पष्टता आलेली नाही. जर नव्या कोचच्या निवड प्रक्रियेत थोडाही उशीर झाला तर पुढील आठवड्यात कोणत्याही दिवशी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेची घोषणा केली जाऊ शकते.

वरिष्ठ खेळाडूंना आराम

टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये भारताचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माशिवाय विराट कोहलीलाही आराम दिला जाऊ शकतो. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांना झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत आराम दिला जाऊ शकतो. अशातच मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व कोण करेल असा सवाल आहे. ऋतुराजकडे टीम इंडियाचे नेतृत्व दिले जाण्याची शक्यता आहे.

Recent Posts

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

2 hours ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

3 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

3 hours ago