पुणे : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) ३० जागा जिंकत महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली. परंतु हीच आघाडी विधानसभेतही (Vidhansabha Election) एकनिष्ठ राहणार का, असा सवाल मविआची सद्यपरिस्थिती पाहता उपस्थित होत आहे. मविआच्या नेत्यांनी ही निवडणूक एकत्रच लढवणार असल्याचे सांगितले असले तरी अंतर्गत वाद मात्र चव्हाट्यावर आल्यावाचून राहत नाहीत. त्यातच आता पुण्याच्या जागांवरुन (Pune vidhansabha) ठाकरे गटात (Thackeray Group) व राष्ट्रवादी शरद पवार गटात (NCP Sharad Pawar group) नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण दोन्ही पक्षांकडून पुण्याच्या मतदारसंघांवर दावा ठोकण्यात आला आहे.
पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली व या बैठकीनंतर पुणे शहरातील ८ पैकी ६ विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार हवा असा अहवाल वरिष्ठांना पाठवण्यात आला. पुण्यातील आठही मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर हडपसर, वडगाव शेरी, खडकवासला, शिवाजीनगर, पर्वती, पुणे कँटोन्मेंट या सहा मतदारसंघांत शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून येणार हा विश्वास सर्वानुमते व्यक्त करण्यात आला.
तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटानेही पुण्यातील सहा मतदारसंघावर दावा केला आहे. कोथरूड, पर्वती, वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या मतदारसंघावर ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला आहे. यांतील चार जागांवर दोन्ही गटाने दावा ठोकला असून त्यामुळे दोघांमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या जागावाटपावेळी पुण्यातील या मतदारसंघावरुन तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागावाटप लांबू शकते. येत्या काळात मविआत कोण सांमजस्याची भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…