मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे नुकतेच लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर आज त्यांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मात्र, या भेटीसाठी ते मागच्या दाराने शिवतीर्थावर (Shivtirtha) दाखल झाले, त्यामुळे या भेटीची विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, यावर नरेश म्हस्के यांनी भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो’, असं ते यावेळी म्हणाले.
नरेश म्हस्के म्हणाले, ‘राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या कार्यालयाला आणि घराला भेट दिली होती. ठाणे व कल्याण लोकसभेसाठी त्यांनी महायुतीसाठी सभा देखील घेतली होती. राजसाहेबांचं मार्गदर्शन काय माझ्या पाठीशी असतं. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरु केलं तेव्हासुद्धा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यामुळे आयुष्यात खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणं मला क्रमप्राप्त ठरतं’, असं म्हस्के म्हणाले.
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनितीबाबत विचारले असता म्हस्के म्हणाले, ‘विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत. मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं बदलली आहेत, काही लोक विशिष्ट समाजाचं दृष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये, काही समाजांमध्ये, काही धर्मांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, ते कशा पद्धतीने आपण लोकांसमोर मांडायला पाहिजे, तसंच त्यांचा जो खरा चेहरा आहे तो लोकांसमोर उघडा पाडायचाय, त्या दृष्टीने रणनिती आम्ही आखली आहे’. याच बाबतीत राज ठाकरेंशी चर्चा झाली का असं विचारलं असता, ‘चर्चा तर होणारच’ असं सूचक विधान नरेश म्हस्के यांनी केलं.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…