PM Narendra Modi : पंतप्रधान म्हणून तिसर्‍या कार्यकाळात नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकर्‍यांसाठी!

Share

पीएम किसान निधीचा १७ वा हप्ता जारी

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काल पंतप्रधानपदाची (Prime ministership) शपथ घेतली आणि ते तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. यानंतर त्यांनी अजिबात विश्रांती न घेता लगेच आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी घेतलेला पहिलाच निर्णय हा देशातील शेतकर्‍यांच्या (Farmers) हिताचा आहे.

नरेंद्र मोदी यांनी आज अधिकृतपणे आपल्या कार्यालयात जाऊन पंतप्रधानपदाचा पदभार स्विकारला. यावेळी सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा (PM Kisan nidhi) १७ वा हप्ता जारी केला.

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) गेले अनेक दिवस आचारसंहिता (Code of conduct) लागू झाल्यामुळे पंतप्रधान किसान निधीमार्फत जो निधी शेतकर्‍यांच्या खात्यात थेट जमा होतो, तो दिला गेला नव्हता. त्यामुळे मोदींनी तिसर्‍या कार्यकाळात पहिली सही पीएम किसान निधीच्या फाईलवर केली आहे. ज्यामुळे हा निधी सगळ्या शेतकर्‍यांच्या खात्यात पोहोचणार आहे.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

5 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

1 hour ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago