मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये(t-20 world cup 2024) वेस्ट इंडिज आणि युगांडा यांच्यात ९ जूनला सामना रंगला आहे. गयानाच्या प्रोव्हिडेन्स स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने युगांडाला खूपच मानहानीकरक पद्धतीने हरवले.
या सामन्यात वेस्ट इंडिजने पहिल्यांदा खेळताना ५ बाद १७३ धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरासाठी मैदानात खेळण्यासाठी उतरलेल्या युगांडाचा नवखा संघ अवघ्या ३९ धावांवर आटोपला. या पद्धतीने वेस्ट इंडिजने तब्बल १३४ धावांनी विजय मिळवला.
वेस्ट इंडिजच्या विजयाचे हिरो ठरला अकील हुसैन. त्याने ११ धावांमध्ये ५ बळी मिळवले. अकीलची ही कामगिरी टी-२० वर्ल्डकपमधील कोणत्याही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांपेक्षा सरस आहे.
तर युगांडाच्या संघाने टी-२० वर्ल्डकपमधील लाजिरवाण्या रेकॉर्डशी बरोबरी केली. दरम्यान, ३९ धावांवर ऑलआऊट होणाऱ्या नवख्या संघाने रेकॉर्डशी बरोबरी केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये २४ मार्च २०१४मध्ये नेदरलँड्सच्या संघाने श्रीलंकेविरुद्ध ३९ धावा केल्या होत्या.
हा वेस्ट इंडिजचा सर्व टी-२० आंतरराष्ट्रीयमधील सर्वात मोठा विजय आहे.
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…