अमळनेर : काही दिवसांपूर्वी बोट उलटल्याने अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घडना सातत्याने घडत होत्या. अशातच अमळनेर शहरातील विद्यार्थ्यांबाबत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रशियात शिकणारे अमळनेरचे तीन विद्यार्थी फिरायला गेले असता तिघांचा रशिया नदीत (Russian River) बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियातील दुतावासमधील कुमार गौरव (आयएफएस) यांनी घटनेची माहिती दिली आहे. तर या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नुसार हर्षल अनंतराव देसले (भडगाव), झिशान अश्पाक पिंजारी, जिया फिरोज पिंजारी (अमळनेर) येथील विद्यार्थी रशियाच्या यारोस्लाव-द-वाईज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये (NovSU) वैद्यकीय शिक्षण घेत होते. हे तिघे आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी त्यांच्या अभ्यासाच्या मोकळ्या वेळेत संध्याकाळी वोल्खोव्ह नदीच्या किनारी फेरफटका मारत होते. त्यावेळी ही अनपेक्षित घटना घडली आहे.
दरम्यान, जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशिया येथील दुतावासातील कुमार गौरव (आयएफएस) यांच्याशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. त्यानुसार निवासी जिल्हाधिकारी सोपान कासार यांनी पालकांना तिथल्या प्रशासनाशी संपर्क करुन दिला आहे. सध्या रशियन फेडरेशनमधील सर्व संबंधित एजन्सीं पुढील कार्यवाही करत आहेत.
अश्पाक पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलैमध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलिकी नोवगोरोद शहरात रवाना केले होते. अभ्यासानंतर रिकाम्या वेळेत हे दोघे मित्रासह वोल्खोव्ह नदीच्या काठावरील पेडिस्टन पुलाजवळील चौपाटीवर फिरायला गेले होते.
नेहमीप्रमाणे जिशान याने आपल्या आईला व्हिडिओ कॉल केला. त्यावेळी जिया नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे, हे आनंदाने तो आपल्या आईला दाखवत होता. मात्र त्याच्या आईने त्याला पाण्यात नको जाऊ आणि जियाला देखील बाहेर यायला सांग, असे म्हटले. मात्र अवघ्या १५ मिनिटांत नदीला पूर आला अन् क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहू लागले. उपस्थितांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यात एकीला वाचवण्यात यशही आले. परंतु जिशान आणि जिया यांचा थांगपत्ता लागला नाही. नातेवाईकांना ही घटना कळवताच कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…